6 महिन्यांत 1074 शेतकर्‍यांची आत्महत्या: बावनकुळे यांनी केली आर्थिक पॅकेजची मागणी

नागपूर:- कोरोना साथीने राज्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या 6 महिन्यांत आर्थिकदृष्ट्या सपशेल हरलेल्या 1074 गरीब आणि मध्यमवर्गीय शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार शेतक-यांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे आणि पॅकेज जाहीर न केल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ज्यामुळे या शेतकरी कुटुंबांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे.

ते म्हणाले की, जानेवारी ते जून या 6 महिन्यात जवळपास दररोज 6 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक धक्का शेतक-यांनाच बसला आहे. विशेषत: फळ आणि भाजीपाला उत्पादकांना तर सर्वाधिक फटका बसला. शेतकर्‍यांचे उत्पादन शेतातच पुर्णपणे खराब झाले.

बावनकुळे यांनी तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली, शेतक-यांना आर्थिक पेचातून मुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी व नुकसान भरपाई जाहीर करावी. ते म्हणाले की, गेल्या वर्षी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात पिके नष्ट झाली.

लॉकडाऊनमुळे दुसरे संकट शेतकर्‍यांवर आले. भाजीपाल्यास भाव न मिळाल्याने, उत्पादनांची बाजारात विक्री न झाल्याने मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शेतक-यांसाठी पॅकेज सादर करून मदत करावी.

Published by

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version