नागपूर: गांधी सागर तलावाकाठी आज अचानक लोकांची गर्दी झाली होती, तलावासभोवती मोठे मासे तजफडताना दिसले, बरेच मासे मरण पावलेले आढळले आणि मृत होऊन बरेच दिवस झाल्याने किना-यावर सडल्यासारखी परिस्थिति झाली होती. ही बातमी उघडकीस येताच नागरिकांनी तातडीने तलावाची साफसफाई करण्याचे काम सुरू करण्याची विनंती नागपूर महानगरपालिकेला दिली. त्यानंतर सफाई कामगारांनी 4 गाड्या मासे हटवले तरीही अद्याप कैक मृत मासे पडून आहेत, ते काढण्याचे काम सुरूच आहे. तलावाच्या सफाई कामगारांचे म्हणणे आहे की त्यांनी आतापर्यंत 4 ते 5 टन कुजलेली मासे बाहेर फेकली आहेत पण मासे कमी होण्याचे नाव घेत नाहीत आणि मासे हळू हळू सडत वर येत आहेत.
तलावामध्ये औषध फवारणी नाही: नागपूर महानगरपालिकेने तलावात फवारणी केल्याच्या चर्चा येत आहेत, त्यामुळे या माशांचा मृत्यू झाला आहे, परंतु नागपूर महानगर पालिकेचे धंतोली विभागातील धर्मेंद्र पाटील यांनी महानगर पालिकेतर्फे असे कोणतेही औषध फवारण्याच्या वृत्तास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणात, माशांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
यावर पर्यावरणतज्ञ कौस्तुभ चटर्जी सांगतात की इतक्या मोठ्या प्रमाणावर माशांच्या मृत्यूमागे बरिच कारणे असू शकतात, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की तलावामध्ये दूषित पाणी मिसळल्याने किंवा पाण्यात एखादा विषाणू मिसळल्याने मासे इतक्या मोठ्या प्रमाणात मरण पावतात, ऑक्सिजनची पातळी कमी झाली असल्यानेही मासे सामान्यत: मरण पावतात, परंतु ज्या प्रकारे येथे माशांच्या मृत्यूचे प्रमाण आहे, ते ऑक्सिजनच्या अभावामुळे होऊ शकत नाही, म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात माशांचे पोस्टमॉर्टम करून मासे मरण्याचे कारण जाणून घेणे फार महत्वाचे आहे.