sanjay

नागपूरमध्ये पोहचताच संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मी आता उपमुख्यमंत्र्याच्या शहरात आलो आहे… कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो.. मी पक्ष आणि संघटनेच्या कामासाठी आलो आहे… कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व जागच्या जागी आहे… महाराष्ट्रातली परिस्थिती म्हणजे भास आहे, हे सर्व तात्पुरता आहे.. शिवसेना अशा परिस्थितीतून अनेक वेळेला बाहेर पडली आहे… गेले 56 वर्ष अनेक संकट, अनेक वादळ आम्ही पाहिले आहे.. शिवसेना विदर्भात काम करत आहे हळूहळू चित्र स्पष्ट होईल… पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला नागपुरात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी पाठवले आहे.. सर्व कार्यकर्ते जागच्या जागी आहे… त्यामुळे चिंता नसावी असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेतली पडझड रोखण्यासाठी ठाकरेंबरोबर उरलेल्या नेत्यांची सध्या धावपळ सुरू आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत हे दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी विमानतळावर उतरताच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. याचवेळी त्यांनी लोकसभेतील आमच्या खासदारांची संख्या ही तुम्हाला लवकरच दिसून येईल, आमची संख्या जशीच्या तशी राहील एवढा विश्वास मी तुम्हाला देतो, असा पुनरुच्चारी केला आहे. तर दुसरीकडे  मोठ्या प्रमाणात खासदार भाजपसोबत असल्याचे दावे एकनाथ शिंदे गटातील आमदार करत आहेत. उदय सामंत हे नशीब 115 खासदार बोलले नाहीत, 15 असतील किंवा 115 असतील, पण शिवसेनेच्या खासदारांचा आकडा हा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत कायम राहील हेच मी सांगू शकतो, असे राऊत यावेळी म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही? मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार हा प्रश्न आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. नागपूरमध्ये ते शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. त्यामुळे विमानतळावर येताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना बंडाबाबत विचारलं असता, आता बंड विसरून जा. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच बंड केलेल्या आमदारांना आम्ही विचारत नाही असंच त्यांनी एक प्रकारे दाखवून दिलं आहे. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी टोला लगावला आहे.

ज्या पद्धतीने या सरकारचं काम चालू आहे, मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे. हे दोघांचं कॅबिनेट यासाठीच काम करत आहे. मात्र आम्ही बघून घेऊ दिवस बदलत जातात. सत्ता परिवर्तन होत असतं. तुम्ही आज पाहिलं की कॅबिनेट बैठक झाली. पण अजून सरकार का अस्तित्वात आलं नाही? मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही? मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना त्यांच्याबाबत अजून निर्णय झाला नसताना मंत्रिमंडळाने शपथविधी घेतला नसताना, मुख्यमंत्र्यांवर स्वतः अपात्रतेची कारवाई होईल, त्यांना राजभवनात शपथ देणे हे बेकायदेशीर आहे आणि 19 तारखेला जर कोणी शपथ घेणार असतील तर ते अत्यंत घटनाबाह्य आहे, अशी टीकाही यावेळी राऊतांनी केली आहे.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version